खरे ‘आजचे नाटक’ हे अमुकच प्रश्नांचे वा अमुकच माहोलाचे असावे लागते, असे मुळीच नाही. ते सर्वच माणसांच्या जगण्याबद्दल आस्था बाळगणारे असावे लागते. माणसाला एकूणच जगण्याच्या प्रक्रियेबद्दल संवेदनशील करणारे - त्याबाबतचे भान देणारे असावे लागते. अशा ‘आजच्या नाटकांचा’ मराठीत दुष्काळ आहे. तशा नाटकांसाठी वातावरण मोकळे राहो आणि लेखक पूर्ण कुवतीने त्यांच्या स्वतंत्र चिंतनशीलतेला महत्त्व देवोत, हीच सदिच्छा