97632 06212 pwatsaru@yahoo.com

फुलेवादाची परंपरा आणि समाजक्रांतीचा पेच - उत्तरार्ध


फुल्यांच्या जातिविद्रोहाची भौतिक प्रेरणा वर्गसंघर्षाच्या दिशेने विकसित होणे ही इतिहासक्रमाची स्वाभाविक परिणती असल्याची वैद्यांची भावना आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातही त्याचा दाखला मिळतो. जातीच्या भौतिक शोषणाचा लढा लढतालढताच सत्यशोधक चळवळ वर्ग व साम्राज्यवादी शोषणाबाबत जागरूक झाली होती. 1930 नंतर सत्यशोधकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून साम्राज्यवादाविरोधात संघर्ष केला. पुढे काँगेसच्या अभिजनवादी धोरणांमुळे मोहभंग झाल्यावर त्यांनी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना करून वर्गलढ्याची भूमिका अंगिकारली. नाना पाटील व काही अन्य सत्यशोधकांनी कम्युनिस्ट पक्षात दाखल होऊन वर्ग संघर्षाला सामाजिक आधार मिळवून दिला. 1936 नंतरचे स्वतंत्र मजूर पक्षाचे डॉ. आंबेडकरांनी उभे केलेले राजकारण जाती संघर्षाबरोबर वर्ग संघर्षाचे प्रारूप अनुसरणारे होते.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe