97632 06212 pwatsaru@yahoo.com

विमुद्रीकरणाकडे चलनी अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहताना...


भारतामध्ये अनौपचारिक आणि औपचारिक क्षेत्रांमध्ये रोखीचा वापर बहुविध प्रकारच्या व्यवहारांनी होतो. 500 व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेतल्यामुळे वित्त पुरवठा करणार्या अनेक साखळ्यांना मोठा धक्का बसलेला आहे. भारताच्या अर्थकारणावर या वित्तीय आघाताचा प्रतिकूल प्रभाव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे चलनविषयक स्थिती पुन:स्थापित करणे अत्यावश्यक झाले आहे. भारतातील अत्यंत छोट्या भागामध्ये रोखीशिवाय बव्हंशी व्यवहार करता येतो. उर्वरित सर्व भारतामध्ये रोखीचेच व्यवहार होत असतात. औपचारिक क्षेत्रांत काही ठिकाणी रोखी आवश्यक असते आणि अनौपचारिक क्षेत्रांत तर रोखीचाच पूर्ण अंमल असतो. आजवरच्या वित्तीय क्षेत्रातील सुधारणांनी बँकिंग आणि रोख भरणा क्षेत्रात फार काही प्रगती झालेली दिसत नाही. परिणामी, व्यवहारांवर नोटांचाच वरचष्मा असतो. भारतात होणार्या एकूण व्यवहारांशी इलेक्ट्रॉनिक व्यवहारांचे असलेले प्रमाण जगात सर्वात कमी आहे. तर सकल राष्ट्रीय उत्पादनाशी रोखीचे असलेले प्रमाण हे जगात सर्वाधिक आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe