97632 06212 pwatsaru@yahoo.com

मराठा मोर्चे : काही प्रश्न


सप्टेंबर 2016 पासून आजतागायत सुरू असलेले मोर्चांचं विवेचन करणे हा या लेखाचा उद्देश आहे. जिल्हास्तरावर सुरू झालेले हे मोर्चे आता तालुकास्तरावर घडत आहेत. मुंबई आणि दिल्लीतदेखील असे मोर्चे संघटित करण्याचे नियोजन दिसते. तसेच भारताबाहेरही मराठे एकत्र येऊ शकतील अशा ठिकाणी ते करण्याचे प्रयत्न दिसताहेत. काही विशिष्ट मागण्यांचे निवेदन त्या त्या ठिकाणच्या सरकारी कार्यालयांमध्ये दिले जात आहेत. हे मोर्चे का निघत आहेत, यामागे कोण आहेत, हे आताच का घडत आहे या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न आपापले वकुबानुसार, समजुतीनुसार, राजकारणानुसार किंवा हितसंबंधांनुसार देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. मात्र काही प्रश्न उपस्थितच केले गेलेले नाहीत, काही प्रश्नांची उत्तरे शोधलीच गेलेली नाहीत. शिवाय काही मुद्द्यांचा विचार या सर्व चर्चांमध्ये होताना दिसत नाही त्यामुळे एखाद्या त्रयस्त व्यक्तीला साप सोडून भुई धोपटण्याचा प्रकार तर घडत नाही ना अशी शंका येते. जे घडतंय ते का घडतंय आणि काय घडतंय, त्याचा कसा विचार करणार किंवा त्याकडे कसं बघणार असा प्रश्न आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe