97632 06212 pwatsaru@yahoo.com

भूकंपाचे राजकीय चरित्र


गुजरात येथील कच्छ जिल्ह्यात भूकंप ही गोष्ट फारशी असामान्य राहिलेली नाही. हा प्रदेश आणि येथील लोक अरबी समुद्राला खेटून आहेत; तिथे भूकंप होण्याच्या सार्या नैसर्गिक गोष्टी अनुकूल अशा आहेत. इथल्या लोकांनी भूकंपाचे धक्के अनेकदा अनुभवलेले आहेत. अगदी अलीकडचेच उदाहरण द्यायचे झाल्यास 26 जानेवारी 2001 चे देता येईल. त्यापूर्वी 1956 आणि 1819 साली या ठिकाणी भूकंप झाल्याच्या नोंदी आहेत. या परिसरातल्या लोककथांतून भूकंपाचे उल्लेख येतात. एखाद्या दुष्ट राजाचा उल्लेख हा भूकंपाची प्रतिमा वापरून केला जातो. या दुष्ट राजाचे राज्य किंवा वसाहत किंवा एखादे विचित्र अशा प्रकारचे संकट याचा उल्लेख करताना लोक भूकंपाची प्रतिमा वापरतात. या पुस्तकात 2001 च्या भूकंपाबद्दलची चर्चा केली आहे. म्हणजे हा भूकंप झाल्यानंतर या संकटाला सामोरे जाण्याचे प्रयत्न (आपत्ती व्यवस्थापन) कसे केले एवढीच चर्चा यात अंतर्भूत नाही पण याहीपुढे जाऊन ही चर्चा मानवंशशास्त्राच्या दृष्टिकोनातून या संकटावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय अशा नैसर्गिक आपत्तींचा आणि अशा आपत्तीनंतरचा समाजाकडे पााहण्याचा एक शास्त्रशुद्ध दृष्टिकोन आपला काय असावा किंवा असला पाहिजे याचीही सविस्तर चर्चा या पुस्तकात आली आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe