97632 06212 pwatsaru@yahoo.com

ब्राह्मणवाद, उदारमतवाद आणि उत्तरवासाहतिक सिद्धान्तन


सर्वसाधारणतः ब्राह्मणवाद, उदारमतवाद आणि उत्तरवासाहतिक हस्तक्षेप हे परस्परांपासून भिन्नच मानले जात नाहीत, तर ते एकमेकांना शह देण्यासाठी म्हणून आले आहेत असेही मानले जाते. जसे की, भारतातील ब्राह्मणवादाला प्रतिवाद म्हणून उदारमतवाद आला. म्हणजेच ब्राह्मणवादाने जातीशी निगडित शुद्धता/अशुद्धतेची संकल्पना तसेच लिंगभावात्मक भेदभाव या आधारावर सामाजिक श्रेणीबद्धता समाजरचना निर्माण केली होती. तिला एक प्रतिवाद म्हणून पश्चिमी उदारमतवाद इथे आला. तर उत्तरवासाहतिक सिद्धान्ताने आधुनिकवादाला शह देऊ पाहिला. येथील मूळच्या समूहात्मक, धार्मिक आणि पारंपरिक समाजामध्ये आधुनिकतेच्या नावाखाली पश्चिमेने केलेला साम्राज्यवादी हस्तक्षेपी तत्त्वविचार असे आधुनिकतावादाचे वैशिष्ट्य सांगून त्याला शह उत्तर वासाहतिक सिद्धान्ताने आव्हान देऊ केला. आणि तरीही आपण जर ब्राह्मणवाद, उदारमतवाद आणि उत्तर वासाहतिक सिद्धान्तनाकडे काळजीपूर्वक आणि काहीसे खोलात जाऊन पाहू लागलो आणि या तिन्ही चौकटींचे परस्परांशी निर्माण झालेले संबंध पाहिले तर ते तीनही एकाच ज्ञानशास्त्रीय परिवाराचे सदस्य दिसतात.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe