97632 06212 pwatsaru@yahoo.com

हरित राजकारण आणि भारत


जगाच्या राजकारणात, विशेषकरून पश्चिमेत, पर्यावरणीय समस्येभोवती राजकारणाची बांधणी विसाव्या शतकाच्या सत्तरीच्या दशकात झाली. साधारणपणे दशकभरात तिचे चळवळीत रूपांतर होऊन भारतासारख्या विकासाच्या मार्गावर असणार्या देशातही शिरकाव होऊ लागला. ‘पर्यावरण’ व त्याशी निगडित असणार्या प्रश्नाभोवती फेर धरणार्या या राजकारणाला ‘हरित राजकारण’ (Green Politics) म्हणून ओळखले जाऊ लागले. वातावरणात हरितता कायम राहावी याकरिता हरित राजकारणाचे पुरस्कर्ते प्रयत्नशील असतात. या विचारधारेला आधार मानून युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलियादी देशांच्या राजकारणात अनेक राजकीय पक्ष व दबावगट क्रियाशील झाले आहेत. सदरील लेखात भारताच्या पातळीवर हरित राजकारणाचे स्वरूप कसे राहिले याचा विचार करावयाचा आहे. त्यापूर्वी हरित राजकारणाच्या उदयाची पार्श्वभूमी थोडक्यात समजून घेणे इष्ट राहील.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe