97632 06212 pwatsaru@yahoo.com

जल-हल यात्रा : सामाजिक हस्तक्षेपासाठी


केंद्र शासनाच्या कृषी मंत्रालयाने मे (2016) महिन्यात जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशातील 34 करोड जनता, 246 जिल्हे आणि 10 राज्य दुष्काळाने प्रभावित झाली आहेत. महाराष्ट्रात मागील तीन-चार वर्षापासून सातत्याने दुष्काळ पडत आहे. राज्यातला शेतकरी शासनसंस्थेकडे मदतीसाठी आशा लावून आहे. मात्र राज्यसंस्था जुजबी स्वरूपाच्या उपाययोजना करत आहे. यामुळे शेतकर्यांच्या उपजीविकेच्या प्रश्नांची स्थिती आहे तशीच आहे. राज्यातील सामाजिक संस्था व संघटना दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी आपापल्या पातळीवर हस्तक्षेप करू पाहत आहेत आणि या हस्तक्षेपातून राजकीय व्यवस्थेला आव्हान देऊ पाहत आहेत. असाच प्रयत्न ‘स्वराज अभियाना’ने जल-हल पद’यात्रेच्या निमित्ताने केला आहे. राज्यातील दुष्काळाने प्रभावित असलेला मराठवाड्यात या पदयात्रेची सुरवात झाली आणि मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातील दुष्काळाने प्रभावित बुंदेलखंड येथे या यात्रेची सांगता झाली. ही यात्रा काढण्यामागे विशिष्ट भूमिका, उद्देश आणि पार्श्वभूमी आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe