97632 06212 pwatsaru@yahoo.com

ही निर्गुंतवणूक कोणाची?


रा. स्व. संघ पंतप्रधान मोदींवर फार नाराज आहे हे आता सिद्धच झाले. तसे नसते तर अरुण शौरी मोदींबाबत जे बोलले ते बोललेच नसते. याचा अर्थ शौरी मूळचे संघवाले आहेत किंवा आता ते भाजपपासून दुरावले आहेत असा नाही. संघाची आपले निरोप पोचवण्याची एक ‘व्यवस्था’ असते. एखादा स्वयंसेवक बेकाबू होत चालला की त्याची कानउघाडणी मुद्दाम जाहीरपणे करायची. फक्त ती संघाच्या मुख्य कारभार्यांकरवी न करता तिर्हाईताकरवी करायची. म्हणजे ‘ते आमचे मत नाही’ असे सांगायलाही संघ मोकळा आणि ‘जे आम्हाला वाटत होते ते सांगूनही टाकले’ असेही स्वतःशी खुदुखुदू हसत पुटपुटायलाही तो मोकळा. ओशाळेपणा टाळायचा हा एक पक्का कातडीबचाऊ कार्यक्रम असतो. आपल्या ऐकण्यातून कोणी बाजूला होऊ लागला की संघ त्याला आपल्या पद्धतीने ऐकवतो. काय म्हणाले शौरी? जगाला जे आधीच माहीत होते ते त्यांनी ऐकवले. मोदी अहंकारी, आत्मकेंद्री, आत्मलुब्ध, एकाधिकारवादी, सोहळेबाज आणि एकारलेले आहेत असे शौरींना तब्बल दोन वर्षांनी उमगले.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe