97632 06212 pwatsaru@yahoo.com

नाण्याच्या एकाच बाजूला


एका शैक्षणिक संस्थेत घडलेल्या एका लहानशा घटनेतून केवळ राष्ट्रीय स्तरावरील चर्चेलाच तोंड फुटत नाही तर देशातील सामाजिक- राजकीय जीवनातील भेदरेषा अधिक ठळक होऊन त्याआधारे विचारांचे ध्रुवीकरण सुरू होऊ शकते? आयआयटी मद्रासमधील विद्यार्थ्यांचा एक अभ्यासगट विद्यापीठाने बेकायदेशीर ठरवत त्यावर बंदी घातली आणि त्यातून एवढे सगळे झाले. खरं तर खुद्द त्या गटाच्या नावातच - आंबेडकर-पेरियार अभ्यास गट, (पुढे फक्त अभ्यासगट) वादाची सुरुवात होत होती असे काहीजणांचे मानणे आहे. भारतातील समाजसुधारणेच्या चळवळीतील दोन महान प्रतीकांच्या नावाने, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि इ. व्ही. रामसामी पेरियार यांच्या संयुक्त नावाने सुरू असलेला हा अभ्यासगट बेकायदेशीर ठरवला जातो व त्यावर बंदी घातली जाते. देशात हिंदुत्ववादी सरकार स्थिरावत असताना वाढत चाललेल्या असहिष्णुतेचा हा एक सज्जड पुरावा होता. साहजिकच या दोन्हीही नेत्यांचे अनुयायी तसेच डावे या विरोधात एकत्र आले.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe