97632 06212 pwatsaru@yahoo.com

अरुणाचल प्रदेश : ‘सत्तेसाठी वाट्टेल ते’ मोदींची नवी नीती


विद्यमान सरकारं उलथवून सत्ता मिळवण्याच्या नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातूनच अरुणाचल प्रदेशातील राजकीय पेचप्रसंग साकारला आहे. दिल्ली, बिहारमध्ये निवडणुकीत लागोपाठ पराभवाचा सामना केल्यानंतर आता अन्य मार्गाने विजय मिळवण्याची मोदी-अमित शहा यांची ही नवी नीती दिसते. 60 सदस्यांच्या सभागृहात सत्ताधारी काँग्रेसचे 47 सदस्य असताना त्यातील चौदाजणांना फोडून त्यांच्याद्वारे इटानगरमध्ये राजवट बदलण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीला अनुसरून सभापतींनी त्या पक्षांतर करणार्या 14 आमदारांची आमदारकी रद्द केली आणि भाजपसमोर पेचप्रसंग उभा राहिला. काँग्रेसचे संख्याबळ घटून 33 झालेले असले तरी उर्वरित 46 जणांच्या सभागृहामध्ये बहुमत टिकवता आले होतेच.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe