97632 06212 pwatsaru@yahoo.com

आव्हानांना भिडताना


स्वातंत्र्य मिळून 67 वर्षे उलटून गेली, परंतु देशापुढील महत्त्वाचे प्रश्न आजही तेवढेच गंभीर आहेत; नव्हे अधिक जटिल बनले आहेत. गेल्या 20 वर्षांमध्ये उपभोगवाद आणि उपभोक्त्यांच्या वाढत्या चंगळवादातून नुसता भ्रष्टाचारच वाढला असं नाही; तर एकूणच समाजाची स्वच्छंदता प्रमाणाबाहेर वाढून त्याच्या पहिल्या शिकार महिला होताना दिसत आहेत. महिलांची व मुलींची सुरक्षा आज देशापुढचं सर्वात अग्रक्रमाचं आव्हान बनलं आहे. आताच गेल्या आठवड्यात नागपुरात मनाला सुन्न करून टाकणार्या बलात्काराच्या तीन घटना घडल्या. त्यापैकी दोन सामूहिक बलात्काराच्या असून त्यापैकी एका घटनेत 21 वर्षांची तरुण शिक्षिका तर दुसरीत 57 वर्षांची एक विधवा प्रौढ स्त्री नराधमांच्या वासनेला बळी पडली. पहिलीला तिच्या मित्रासमक्ष रस्त्यावरून ओढून निर्जन ठिकाणी ओढून नेले, तर दुसरीच्या झोपडीत शिरून रात्रभर तिच्यावर पाशवी अत्याचार केले. तिसर्या एका घटनेत लहानशा चार वर्षांच्या चिमुकल्या मुलीवर शेजारच्यानेच लैंगिक अत्याचार केला. यात आरोपी मोकाटच असल्यामुळे समाजात कमालीची दहशत आणि असुरक्षिततेची भावना आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe