97632 06212 pwatsaru@yahoo.com

भरकटलेले मुंबई शहर


लेखक सांगतात की, 1890 च्या दशकातील प्लेगच्या साथीनंतर पुनर्विकासाच्या प्रकल्पाला ज्या तर्हेने विरोध झाला होता तसाच हा विरोध होता. मुंबई सुधारणा ट्रस्ट 1898 साली झाला तेव्हा मुंबईच्या रोगाने ग्रस्त असणार्या शहरामध्ये गरिबांच्या नावाने स्वच्छता आणि खुल्या जागा निर्माण करण्याची घोषणा केली गेली. असे करण्याला त्या काळात आर्थिक कारणही होते. कारण 1901 पर्यंत त्या दशकात सहा टक्के लोकसंख्या घटली होती आणि गिरण्यांमध्ये काम करायला माणसे नव्हती. अशा तर्हेने मुंबई सुधारणा ट्रस्ट अधिक तत्परतेने कार्यरत व्हावी म्हणून ह्या संघटनेला स्वतंत्रपणे काम करण्याची मुभा देण्यात आली होती. आणि म्हणून मग नोकरशहांना मनमानी करून निर्णय घेता येणे शक्य झाले होते. त्यावेळीही कोणत्याही एका केंद्रित नियोजनाचा विचार न करता तात्कालिक आणि उत्स्फूर्त पावले उचलली जाण्याचे धोरण आले.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe