97632 06212 pwatsaru@yahoo.com

शहरं नद्यांना विसरतात, पण...


शहरं आणि नद्या कायमच एकत्र असतात. पिण्याचं गोड पाणी आणि वाहतुकीचा मार्ग यामुळे अनेक शहरं नद्यांच्या किनार्यावर वसली आहेत. तरीही नद्या विसरण्याची एक विचित्र खोड शहरांना लागली आहे. जसजशी शहरं मोठी होत जातात आणि पाण्याचे पर्यायी स्रोत, उदाहरणार्थ, तळी, ती निर्माण करू लागतात तसतसे पिण्याच्या पाण्यासाठी नद्यांवर अवलंबून राहणे कमी होते. त्याचप्रमाणे रस्ते आणि रेल्वेमार्गांमुळे वाहतुकीसाठीचा नदीचा वापर थांबतो. शहरातलं सांडपाणी आणि औद्योगिक वसाहतींमधले सगळ्या प्रकारचे बरेवाईट द्रवपदार्थ नदीत सोडले जातात. परिणामी नद्यांचे स्वरूप इतके बिघडते की ती न दिसली तर बरी अशी स्थिती होते. मग बाजूने भिंती उभ्या करणे किंवा सरळ सरळ जशी आपण गटारं झाकून टाकतो त्याचप्रमाणे नद्याही झाकण्याचे उपाय केले जातात.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe