97632 06212 pwatsaru@yahoo.com

बिहार : ओबीसी राजकारणाची पुनर्मांडणी


बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही आघाड्यांमध्ये धामधूम सुस्पष्टपणे दिसत होती. परंतु निवडणूक निकालाचे चित्र महाआघाडीने तंतोतंत जुळवलेले दिसून आले. महाआघाडीने कोणती सामाजिक व्यूहनीती वापरली होती. एनडीएची प्रचारातील धामधूम निवडणूक निकालामध्ये का दिसत नाही. निवडणूक निकालाचा अर्थ यादव-कुर्मी वर्चस्वाच्या पुनर्मांडणीचा आहे का? यादव-कुर्मीच्या वर्चस्वाची पुनर्मांडणी जातकेंद्रीत आहे की त्यामध्ये फेरबदल झाले आहे. उच्च जाती, दलित आणि मुस्लीम यांचे राजकीय संबंध यादव-कुर्मीशी कोणत्या पद्धतीने आले. उच्च जाती आणि यादव-कुर्मी यांचे संबंध जुन्या आघडा-पिछडा या संकल्पनेतील आहेत का? किंवा नव्या संदर्भांत नवी जुळवाजुळवी केली गेली आहे. दलित-मुस्लीम यांचे यादव-कुर्मीबरोबरचे संबंध आश्रय-दाता स्वरूपाचे आहे का? तसेच महिला आणि महाआघाडी यांच्या राजकीय संबंधाची पुनर्रचना कशी केली गेली? हे सामाजिक समझोत्यांचे राजकीय यक्षप्रश्न आहेत. याशिवाय या निवडणूक निकालाचा परिणाम बिहारच्या राजकारणावर, विविध राज्याच्या राजकारणावर आणि राष्ट्रीय राजकारणावर कसा होईल. यातून राज्यांच्या आणि राष्ट्रीय राजकारणाची पुनर्मांडणी होण्याच्या काही आशा दिसत आहेत का? या प्रश्नाची चर्चा प्रस्तुत लेखात केली आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe