97632 06212 pwatsaru@yahoo.com

चित्रमय भारत अजित दोडिया


भारतीय कला आशयाच्या अंगाने फार बदललेली नाही. स्वदेशी चळवळीपासून आजपर्यंत अनेक लहान मोठ्या चळवळी झाल्या तरी भारतीय पुराणकथा, मिथकं, आध्यात्म किंवा ग्रामीण जीवन हेच विषय कलेत राहिले त्यात काही बदल झालाच नाही. या सर्व चळवळींनी निर्मितीची शैली बदलली आशय तोच तोच राहिला. भारतीय पुराणामुळे बदललेले भारतीय जीवन, भारतीय तत्त्वज्ञानाने बदललेले जीवन, या बदलाची इतर कलेने घेतलेली दखल याबाबत भारतीय चित्रकार सावध नाही. थेट तत्त्वज्ञानाच्या प्रतिमा तयार करायच्या, पुराणकथा पुनरुपीत करायच्या, आपल्या कलेत आध्यात्मिक चेतना असल्याचे गृहीत धरायचे. निसर्गाचे ऋत् न समजता त्याचे मोहक रूप चितारायचे. यातून भारतीय चित्रकारांना ना नीट पुराण कळले, ना नीट तत्त्वज्ञान कळले ना निसर्ग कळला. चित्राची वरपांगी तात्पूर्ती गरज म्हणून तो याकडे पाहतो.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe