97632 06212 pwatsaru@yahoo.com

खरे दहशतवादी कोण?


सप्टेंबर, 2015 मध्ये पोर्टब्लेअर (अंदमान) येथे भरविलेल्या विश्वसाहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक-विचारवंत शेषराव मोरे पुरोगाम्यावर बोलताना असे म्हणाले, की स्वत:ला हिंदू म्हणवून घेणारा प्रतिगामी ठरविला जातो. हिंदूंच्या विरोधात जेवढे अधिक बोलू तेवढे आपण पुरोगामी असे स्पष्टीकरण रूढ होत आहे. मोरे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी असेही प्रतिपादन केले की, हिंदू शब्दाचा वापर करुन आपण प्रतिगामी किंवा जातीवादी तर ठरणार नाही ना! या भीतीखाली आजची मराठी वैचारिकता वावरत आहे. हा एक प्रकारचा दहशतवाद असून त्याने मराठी वैचारिकतेला घट्ट विळखा घातला आहे. शेषराव मोरे हे सावरकरांच्या बुद्धिवादी, विज्ञाननिष्ठ आणि सेक्युलर विचारांनी भारलेले असून त्यांच्यावर सावरकरांच्या विचारांचा प्रभाव आहे. ते अभ्यासू साहित्यिक आणि विचारवंत म्हणून त्यांची महाराष्ट्राला ओळख आहे. त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेल्या विचारांना अधिक गांभीर्याने घ्यावे लागते. त्यांनी केलेल्या विचारांवर उलटसुलट प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविकच आहे!

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe