97632 06212 pwatsaru@yahoo.com

पारधी बदलतायत, पण...


स्वातंत्र्य मिळून आता सत्तर वर्षे व्हायला आली तरी आपल्या देशात अजूनही जे समूह उपेक्षित आणि पीडित आहेत त्यांच्यामध्ये पारधी समाजाचा समावेश होतो. निरनिराळ्या कारणांमुळे पारध्यांचे नाव चर्चेत असते. बहुतेक वेळा त्यांच्यावर होत असलेल्या अत्याचारांमुळे, काही वेळा त्यांच्या हातून घडणार्या गुन्ह्यांमुळे तर काही वेळा त्यांच्यामध्ये कार्य करत असलेल्या कार्यकर्त्यांमुळे. मात्र यामध्ये पारधी समाजाच्या विकासाची किंवा त्यांच्यामध्ये होणार्या परिवर्तनाची चर्चा मात्र अभावानेच आढळते. सध्या भोवतालची सगळीच परिस्थिती बदलतेय अशा वेळी पारधी समाज बदलतोय की नाही, बदलत असेल तर कशाप्रकारे, या बदलाकडे आपण कशा रीतीने पाहतो आणि त्या बदलाची प्रक्रिया गतिमान व्हावी यासाठी काय करू शकतो या प्रश्नांची चर्चा करणे महत्त्वाचे झालेले आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe