97632 06212 pwatsaru@yahoo.com

महाराष्ट्रातील दुष्काळ निर्मूलनाच्या मार्गातील पेच...


१९७२ या भीषण दुष्काळी वर्षापासून दर दोन-तीन वर्षांच्या अंतराने दुष्काळ पडत आला आहे. तरीही या ४० वर्षांत दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आली नाही. १९७२ साली दुष्काळाच्या वेळी जी पायाभूत कामे झाली ती झाली, नसती तर आजचा दुष्काळ हा अजूनही तीव्र स्वरूपाचा असता. त्या एका दुष्काळाच्या वेळी जी कामे झाली, तेवढी कामे गेल्या ४० वर्षात एकत्रितपणेदेखील झालेली नाहीत. प्रत्येक वर्षीच्या सिंचन आराखड्यात जे लक्ष्य ठरवण्यात येते, ते कधीही पूर्ण होत नाही. हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या काही प्रकल्पांचा अपवाद करता नियोजित वेळेत कोणताही प्रकल्प पूर्ण करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रकल्पासाठी लागणारा खर्च वाढत जातो. दुष्काळी प्रदेश असो की नियमित पावसाचे क्षेत्र असो, दोन्ही प्रदेशात साखर कारखान्यांची संख्या वाढत चालली आहे. साहजिकच ऊस लागवड क्षेत्रदेखील वाढत चालले आहे. दुष्काळी भागात याचा आधीच कमी असलेल्या पाणीसाठ्यावर ताण येतो. पीकपद्धतीत बदल होत आहेत. नगदी पिके घेण्याकडे शेतकर्यांंचा कल वाढत आहे. या सर्व बाबींच्या परिणामी महाराष्ट्रातील दुष्काळाची उपाययोजना अधिकाधिक बिकट बनत जाते आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe