97632 06212 pwatsaru@yahoo.com

जागतिक मुक्त व्यापार व भारतीय शेती


औद्योगिक क्रांतीनंतरच्या (इ.स. 1750-1920) आतापर्यंतच्या दोनशे वर्षांत अर्थशास्त्रातील बर्याचशा संकल्पना औद्योगिक विकसित राष्ट्रांच्या हिताच्या दृष्टीने निर्माण झाल्या व बोलल्या गेल्या. व्यक्ती स्वातंत्र्य हे साम्राज्यवादी शासकांसाठी होते वसाहतींतील गुलामांसाठी नव्हते. अजूनही तसेच चालू आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार मुक्त असावा म्हणजे काय? विकसनशील देशांतील लोकांना वाटते की आपल्या विकासाच्या गरजांनुसार आयात-निर्यात जकाती लावून व आवश्यक तसे निर्बंध लावून किंवा कमी करून त्या व्यापाराद्वारे एकूण विकास करून घेता आला पाहिजे. मात्र आताच्या स्वयंचलित व इलेक्ट्रॉनिक्सच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून स्वत:च्या गरजांपेक्षा कितीतरी पटींनी जास्त औद्योगिक उत्पादन असता निर्माण करून ठेवलेल्या (व स्पर्धेत इतरांना मात दिल्याशिवाय स्वत:चा नङ्गा कमाविता येत नाही म्हणून) बलाढ्य कंपन्यांना माल विकण्यासाठी सगळ्या जगाचे बाजार कररूपी किंवा संख्यात्मक निर्बंधविरहीत असे हवे आहेत. ही गोष्ट 20 व्या शतकाच्या मध्यापर्यंत (द्वितीय महायुद्धापर्यंत) बर्याच प्रमाणात साम्राज्यवादाच्या द्वारे सिद्ध केली गेली. साम्राज्यवादाच्या लढ्यानंतर विकसनशील देशांना निरूत्तर करणारे व त्याचवेळी विकसित देशांतील कंपन्यांना हवे असलेले स्वातंत्र्य देणारे जागतिक मुक्त व्यापाराचे तत्त्व सांगून ते जागतिक व्यापार संघटनाचा (1995) आधार बनवून तसेच आर्थिक लाभ चालू ठेवण्याचा अट्टहास चालू आहे.

Subscribe Now !

Get instant access to the complete Watsaru archives

New 3-Month Subscription to Digital Archives at just Rs 350 for India and $15 for overseas users.

Subscribe